Breaking News

जीभेला आवर घाला; अन्यथा जुनी प्रकरणे बाहेर काढु!

जीभेला आवर घाला; अन्यथा जुनी प्रकरणे बाहेर काढु!

आनंद परांजपे यांचा शिवसेना नेते रामदास कदमांना इशारा

ठाणे (वार्ताहर) - राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शिवसेनेचे (शिंदे) ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेल्या टीकेवरून महायुतीमध्ये सध्या वादाची ठिणगी पडली आहे. रामदास कदम यांनी तटकरे यांच्याबाबत केलेल्या एका अभद्र टिप्पणीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. रामदास कदम यांनी यापुढे सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना भान ठेवावे, अन्यथा आम्हालाही त्यांच्याच भाषेत जशास तसे उत्तर देता येईल, असा सज़ड इशारा परांजपे यांनी रामदास कदम यांना दिला आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी रामदास कदम यांना जुन्या प्रकरणांची आठवण करून देत इशारा दिला की, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधिमंडळात कदमांवर जे गंभीर आरोप केले होते, तसेच त्यांच्या कुटुंबाशी संबंधित डान्सबारच्या मुद्यावर आम्हाला बोलायला भाग पाडू नका. आम्ही आजवर युतीधर्माचे काटेकोर पालन केले आहे आणि सुनील तटकरे यांनीही नेहमीच समन्वयाची भूमिका घेतली आहे. मात्र, कदम यांनी आपली मर्यादा ओलांडून अभद्र भाषा वापरल्यास गप्प बसणार नाही, असे परांजपे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना परांजपे म्हणाले की, सुनेत्रा अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी, हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. सध्या पक्ष एका अत्यंत कठीण काळातून जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या धक्कयातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीबाबत किंवा इतर राजकीय नियुक्त॒यांबाबत पक्षनेतृत्व योग्य वेळी निर्णय घेईल असेही त्यांनी नमूद केले. अजित पवार यांच्या अपघाताबाबत बोलताना परांजपे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...