महामानवास वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून अभिवादन...
ऐरोली (प्रतिनिधी) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली से-१५ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. भारताच्या संविधान निर्मात्यांना सादर प्रणाम. बाबासाहेबांच्या विचारांनीच सामाजिक न्याय, समता आणि बंधुता यांचा मार्ग उजळला आहे. बाबासाहेबांच्या आदर्शाप्रती निष्ठा ठेवून आपण सर्वांनी एकसंध, प्रगत समाजघडणीसाठी प्रयत्नशील राह्या असे आवाहन यावेळी ना.गणेश नाईक यांनी केले. याप्रसंगी माजी खा.डॉ.संजीव नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, माजी सभागृह नेते अनंत सुतार आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
